---Advertisement---

Toll free travel for EVs in maharashtra ? EV धारकांसाठी आनंदाची बातमी समृद्धी महामार्ग व मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग वरती टोल माफ होणार ? महाराष्ट्र सरकारचा मोठा विचार !

By dolasaniket611@gmail.com

Updated on:

Follow Us
---Advertisement---

महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सरकार कडून एक चांगला निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे . 1 मे 2025 पासून इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग टोल फ्री करण्याची दाट शक्यता आहे .

या निर्णयामागील हेतु काय ?

सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण वाहने ही 4.88 कोटी आहेत , त्यापैकी केवळ 6% वाहने ही EV आहेत . दिल्लीत 12% , कर्नाटकमध्ये 9% , तामिळनाडूमध्ये 8% EV चा वापर आहे .

महाराष्ट्रामध्ये electric vehicle चा वापर 25% पर्यन्त नेण्याचा महाराष्ट्र सरकारचा हेतु आहे , टोल माफी ही त्या दिशेने उचलेले एक छोटेशे पाऊल आहे .

EV मालकांसाठी याचा चांगलाच फायदा होणार आहे ,

सहजच प्रवासाचा खर्च कमी होणार

चार्जिंग स्टेशन वाढणार

EVs ला जास्त प्रायोरिटी राहणार

दर 25 km अंतरावर असणार चार्जिंग स्टेशन

EV चा वापर वाढवायचा म्हटल तर चार्जिंग स्टेशन तर वाढवावेच लागतील , चारचाकी, बसेस व ट्रक साठी high presure चार्जिंग ची सुविधा दर 25 किलोमीटर ला असणार आहे . राज्यात उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग स्टेशन पैकी 10% तर यशवंतराव चव्हाण द्रुतगती व समृद्धी महामार्ग वर उभारली जातील , तर बाकी राज्यातील अन्य मार्ग वर उभारण्यात येतील .

सध्याची स्थिति :

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग वर 1 एप्रिल 2025 पासून टोल दरामध्ये 19% नी वाढ झाली आहे .

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग वर टोल दर एप्रिल 2030 पर्यन्त वाढवले जाणार नाहीत .

जर तुम्ही EV घेण्याचा विचार करत असाल , तर आता एकदम योग्य वेळ आहे . EV ही फक्त ट्रेंड नही तर भविष्यासाठी आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे.

EV चा वापर वाढवण्यासाठी सरकारला अजून काय करायला पाहिजे ? खाली कमेन्ट करून तुमचं मत मांडा .

---Advertisement---

Related Post

Leave a Comment